पुलवामामध्ये तीन दहशतवादी ठार   

सुरक्षा दलाबरोबर उडाली चकमक

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा रक्षकांबरोबर उडालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. त्यामुळे गेल्या ५० तासांत चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या आता सहा झाली आहे.
 
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्यांचा शोध आणि खात्मा करण्याची मोहीम राबविण्यात आली आहे. त्या अंतर्गत दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरातील त्राल परिसरात तीन दहशतवादी ठार झाले आहेत. शोध मोहीम सुरू असताना जवानांच्या दिशेने दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्याला चोख उत्तर देण्यात आले. त्यात तीन दहशतवादी ठार झाले आहेत,. दरम्यान, तिन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. दहशतवाद्यांची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. चकमकीत मारले गेलेले दहशतवादी जैश-ए-महम्मदचे असून त्यांची नावे अहमद, आमिर नजीर आणि आसिफ अशी आहेत.

शोपियाँमध्येे तीन दहशतवादीही ठार

यापूर्वी शोपियाँ जिल्ह्यात तीन दहशतवादी मारले गेले होते. यामध्ये लष्कर-ए-तैयबाचा म्होरक्या शाहिद कुट्टेचाही समावेश होात.. एका अधिकार्‍याने सांगितले की, कुट्टे काश्मीर खोर्‍यात दहशतवाद्यांची भरती करण्याचे काम करायचा. त्याने अनेक तरुणांना लष्कर-ए-तैयबामध्ये सामील होण्याचे आमिष दाखवले होते.
 

Related Articles